माहितीचा अधिकार-एक प्रभावी शस्त्र
माहितीचा अधिकार-एक प्रभावी शस्त्र इंग्रजांनी भारताची लूट करण्यासाठी गोपनीयतेचा कायदा (official secretary act) हा १९२३ मध्ये केला होता. या कायद्यामुळे कोणतीही माहिती गुप्त ठेवली जात होती. त्यामुळे प्रशासन कार्यक्षम आणि पारदर्शक बनू शकले नाही. कोणतीही गोष्ट लपवून ठेवून अन्याय व अत्याचार करण्याचे शस्त्रच प्रशासनातील लोकांना मिळाले. गोपनीयतेच्या गोंडस नावाखाली लोकशाहीचा आत्माच नष्ट झाला आणि प्रचंड भ्रष्टाचार वाढला. वास्तविकता लोकशाहीतील सरकार हे जनतेला जबाबदार असते. सरकारच्या कारभाराची जनतेला माहिती असली पाहिजे, आणि ती घेण्याचा जनतेचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत १९(१)(अ) या तरतुदीचा ज्ञान किंवा माहिती मिळविण्याचा अधिकार हा गभितार्थ आहे. यातूनच पारदर्शक समाजाची संकल्पना उद्भवते. भ्रष्टाचार हा सर्वत्रच आहे. त्यासाठी कठोर कायदे पाहीजेत. भ्रष्टाचार नावाच्या दहातोंडी रावणाला ठार मारण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'माहितीचा अधिकार' आहे. ख-या अर्थाने हा कायदा सत्तेच्या दुरूपयोगाला विरोध करण्याचे जनतेला मिळालेले सामर्थ्य होय. या सामर्थ्याचे महत्व ओळखत...